लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.१६ जुलै२०२४ |
आषाढी एकादशी निमित्त श्री.संत ज्ञानेश्वर विद्यालयाने दिंडी काढून विठ्ठल नामाच्या जपा बरोबरच वृक्षारोपणाला मदत म्हणून बिया वाटून पर्यावरण संरक्षणांची जनजागृती केली.
शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. या माध्यमातून परिसरातील भाविकांना प्रसाद म्हणून वृक्षारोपणाला मदत म्हणून बिया वाटप करण्यात आल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूख्मिनी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर चिमूकले बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता. विठ्ठल नामाच्या जपा बरोबरच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण विषयी जनजागृती केली.स्वतः वृक्षारोपण करून इतरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना केले.
उत्साहात पार पडकेल्या सोहळ्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.