
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ मार्च २०२५ |
जळगाव रेल्वे मालधक्क्यावरुन सिमेंटचे लोड करुन छञपती शिवाजी नगर उड्डाणपुलावरुन जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रकचालकाचे ट्रकवरिल नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरुन रिर्व्हस येत उड्डाणपुला शेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना चिरडले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना शनिवार दि. २२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छञपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली.
सुरत रेल्वेगेटजवळ असलेल्या मालधक्क्यावरुन सिमेंट लोड करुन (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजी नगरच्या उड्डाणपुलावरुन जात होता. उड्डाणपुलावरील काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रक हा उतारावरुन मागच्या बाजूने रिर्व्हस येवू लागला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना चिरडत वडाच्या झाडावर जावून आदळून तो थांबला.
शहरातील राधाकृष्ण नगरात राहाणरे सुरेश ओस्वाल (वय ५०) यांना रिर्व्हस येणाऱ्या ट्रकने धडक दिली, यामध्ये ओस्वाल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले. तसेच उड्डाणपुलाशेजारी उभे असलेले रुपेश गोपाल चौधरी (वय ४३, रा. वरणगाव, ता. भुसावळ), आशा बानो यांच्यास अन्य दोघे जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या अपघातात नुकसान ग्रस्त झालेल्या रिक्षा चालकांसह दुचाकीस्वारांनी ट्रकच्या मालकाने नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. या मागणीसाठी त्यांनी अपघातस्थळी ठिय्या मांडला होता.





