जळगाव मनपा निवडणूक रणधुमाळी; आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
१९ प्रभागांत २८७ नामनिर्देशनांची विक्री; २५० उमेदवारांनी भरले अर्ज

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ३० : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका मुख्यालयात दिवसभर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. एकूण १९ प्रभागांत २८७ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असून त्यापैकी २५० उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे व उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेससह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविल्याने राजकीय वातावरण तापले आहे.आज दिनांक ३० डिसेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उत्सुकता.शिगेला पोहचली आहे.
एकूणच, १९ प्रभागांत २८७ नामनिर्देशन पत्रांची विक्री आणि २५० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने जळगाव महापालिका निवडणूक आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने खऱ्या अर्थाने निवडणूक रणधुमाळीला वेग येणार असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.







