
लोकमाध्यम न्युज जळगांव दि.१७ : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या श्री स्वामी समर्थ पालखी – पादुकांचे सोमवार 19 रोजी शहरात
आगमन होणार आहे. सकाळी 11 वाजेला पालखीचे आगमन होऊन पूजा – अभिषेक व महाआरती नंतर लगेच महाप्रसाद (भंडारा)होणार असून भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात पालखी सोहळ्याचे हे 19 वे वर्ष आहे.
परगावच्या भाविकांना श्री स्वामींच्या दर्शनाचा लाभ व्हावा तसेच अक्कलकोट तिर्थस्थळी बांधण्यात येत असलेल्या
महाप्रसादालय व नवीन भक्त निवासाच्या बांधकामास निधी उपलब्ध व्हावा या उद्देशातून क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्यावतीने पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात येते. ही पालखी महाराष्ट्र,कर्नाटक गोवा राज्यातून परिक्रमा करते. त्याअंतर्गत सोमवार दि.19 रोजी सकाळी 11 वाजेला पालखीचे शहरात आगमन होणार आहे. त्यानंतर पांडे डेअरी चौकाजवळील रामदेवबाबा मंदिर येथून पालखीची सवाद्य मिरवणुक गणेश वाडीतील सुकदेव शिरसाळे यांच्या निवासस्थानी येईल. त्यायाठिकाणी पूजा – अभिषेक व महाआरती होऊन लगेच महाप्रसाद (भंडारा) होईल. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे शिरसाळे परिवारातर्फे आवाहन करण्यात आले आहे.





