
| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) –येथील वेंकटेश नगरातील रहिवासी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्राध्यापक प्रा. डॉ.गोपी सोरडे यांच्या पत्नी सौ. अंजली सोरडे यांचे आज गुरूवार दि.9 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरून नेरी नाका वैकुंठधाम येथे निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू, दीर, भावजय, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक डॉ. गोपी सोरडे यांच्या पत्नी होत.





